Pages

Total Pageviews

Tuesday, December 25, 2012

कारण तो सचिन होता



 ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला  'तो' ह्या विषयावर  बोलता येणार नाही म्हणून  तर कुणाला  'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू!  कुणाला 'पण तो देव नाही आहे...'  असं सारखे  म्हणता येणार नाही म्हणून तर ' तो ग्रेट वगेरे असेल ... पण बाबा लोकांच्या  मागे का फिरतो'  हा आक्षेप घेता येणार नाही म्हणून कडू! आमच्यासारख्या लोकांना मात्र तो आता खेळणार नाही ह्या एकाच कारणासाठी ही बातमी कडू आहे! 


 सचिन केव्हातरी निवृत्त होणार होताच. प्रश्न फक्त आमच्या सारख्या लोकांचा होता जे ह्या बोचऱ्या सत्यापासून सतत लांब पळत होते.  तरी अधून मधून विचार डोकवायचा. पण काही क्षण  हृदयाचे ठोके चुकवून परत जाण्यापलीकडे ह्या विचाराने काहीही केले नाही.  आणि आज मात्र ह्या अनपेक्षित बातमीने धक्का तर दिलाच पण मनात मिश्र भावनांचे वादळ देखील उठले.  उद्यापासून  सचिनला निळ्या जर्सी मध्ये बघता येणार नाही ही कल्पना तरी कशी करायची? २३ वर्ष लागलेली सवय अचानक मोडणार! 'माझं नाव आशय आहे' हे समजण्याची अक्कल आली त्या वयापासून ज्या व्यक्तीचे नाव आयुष्याशी जोडले गेले आहे ती व्यक्ती आता फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना आणि ते सुद्धा काही दिवसच आपल्याला दिसणार?

कामावर आलो. रात्रपाळी सुरु असताना लॉबी मध्ये सचिनचा विषय निघालाच. आणि साक्षात्कार होत गेला की इतर खेळाडू हे खेळाडूच  आहेत आणि सचिन मात्र  'आपला सचिन' आहे. माझ्या कलीग ने विषयाला वाचा फोडून दिली.
" तुम्हाला सांगतो...आमच्या गावी रेडियो वर आम्ही सामने ऐकत असू. आमच्या गावी ही बोचरी थंडी... अंगावर गोधडी घेऊन रेडियोला  मध्ये ठेऊन गोल करून बसायचो... सचिन जेव्हा चौकी किंवा छक्की मारायचा तेव्हा अंगावरची गोधडी आम्ही हातात घेऊन नाचत नाचत गोल  फिरवायचो! तेवढ्यापुरती थंडी-बिंडी  काही नाही... मग पुढे काय होतंय हे ऐकायला आम्ही परत गोधडी पांघरून बसायचो... थंडी होती ना... काय ते दिवस होते.. " - सचिनसाठी अंगावरच्या थंडीची देखील परवा न करणारा हा माझा मित्र! आणि ते सुद्धा रेडियो वर ऐकताना.. टी . वी बघताना वगेरे नाही!  ह्या खेळाडूने सर्वांच्या मनात घर कसं केलं होतं  हेच ह्या उदाहरणातून दिसून येतं.


 माझे मन लगेच बरीच वर्ष मागे सरकले. १९९३ हे वर्ष असावं. इंग्लंडचा संघ भारतात आला होता आणि त्यातील एक टेस्ट मुंबईच्या वानखेडे स्टेडीयम मध्ये होती. आई- बाबांनी मला क्रिकेटची match दाखवायचे ठरवले.  त्यावेळेस पनवेल वरून लोकल वगेरे काही नसल्याने मुंबईला जाणे कठीण होते. पण तरीही 'आपण आज सचिनला बघणार' हे मला सकाळपासून सांगितले गेले होते आणि त्यामुळे मी आनंदाने तयार देखील झालो होतो. पण स्टेडीयम मध्ये पोहोचेपर्यंत समजले की  सगळी तिकिटे संपली होती! आता काय करणार?  शेवटी बाबांनी एका पोलिस हवालदाराला विचारून बघितले. " मुलगा लहान आहे.. पनवेल वरून आलो आहोत आम्ही... ह्याला सचिनला बघायचंय!" आणि आश्चर्य म्हणजे 'सचिन' हे नाव ऐकल्यामुळे आम्हाला विना तिकीट आत प्रवेश मिळाला! आणि आम्ही तो सामना 'टी - टाइम ' पासून खेळ संपेपर्यंत बघितला. त्यावेळेस मी होतो ६ वर्षांचा आणि सचिन तेंडुलकर ह्या व्यक्तीने खेळायला आरंभ केलेल्याला ४ वर्ष झाली होती.  केवळ ४ वर्षात नावाभोवती हे वलय!  त्या संध्याकाळी सचिन आणि कांबळी खेळत होते. सचिनने मारलेला तो 'कवर ड्राईव' मात्र मला अजून स्वच्छ लक्षात आहे... एखाद्या रंगलेल्या मैफलीत कलाकार चांगली जागा घेतो आणि आपल्याला ती आयुष्यभर लक्षात राहते तसं! आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा तो गजर ऐकला - ' सचिन, सचिन ...( तीन  वेळा टाळ्या)'. त्या अनोळखी लोकांमध्ये ओरडण्यात  मी देखील सामील झालो. आता मात्र  ते त्याच्या नावाने ओरडणं यु -ट्यूब वरच  बघायला मिळेल!
  
लगेच मला एक दुसरे उदाहरण आठवले. आता बऱ्यापैकी इतिहासजमा झालेल्या 'ऑर्कुट' ह्या वेबसाईट वर मी ते वाचले होते.  एका अगदी छोट्याशा खेड्यात तो ऑर्कुटवर लिहिणारा  इसम गेला होता. तिकडे  त्याने पाहिले  की त्या खेड्यात फक्त एका टपरीवाल्याकडे एक छोटा रेडियो होता. त्यादिवशी नेमका  क्रिकेटचा सामना सुरु होता. एक म्हतारा शेतकरी तिकडे आला. तो मुका असल्यामुळे त्याने खुणेने काहीतरी विचारायचा प्रयत्न केला. टपरीवाल्याने सचिन आउट झाल्याचे त्याला सांगितले आणि तो म्हातारा चक्क जमिनीवर पाय आपटत रडू लागला! आणि वरती आकाशाकडे इशारे करीत निघून गेला. टपरीवाला नंतर स्वतः म्हणाला, " ह्या म्हाताऱ्याचे लांब ६-७ किलोमीटर वर शेत आहे. पण क्रिकेटचा सामना असला की केवळ सचिनने किती केले हे ऐकायला तो इथपर्यंत येतो." ही म्हणजे कमाल झाली. ह्या माणसाचा स्कोर ऐकायला ( बघायला नव्हे ) कुणाला एवढे श्रम घेण्यात सुद्धा काहीच वाटत नाही. मला एकदम आठवलं. दुकानात रेडियो सुरु असायचा. येणारी जाणारी लोकं दोन प्रश्न विचारायची. " कितना हुआ?" आणि "सचिन का कितना हुआ?"


असाच एक घरचा किस्सा आठवतो. कुठलासा सामना सुरु होता. सचिन नेहमीप्रमाणे बहरत होता. रात्रीची ९ ची वेळ असेल. तो साधारण ८५-८६ पर्यंत गेला असताना समोरच्या इस्त्रीवाल्याचा मुलगा इस्त्री केलेले कपडे घेऊन आमच्याकडे आला. माझ्यापेक्षा फक्त एक वर्षाने मोठा. त्यावेळेस मी  १२-१३ वर्षांचा असीन. त्याने दारात कपडे देताच टी. वी  वर स्कोर झळकला. सचिन तेंडुलकर - ९०. आता काय करायचं ह्या प्रश्नाने तो मुलगा अस्वस्थ झाला. दुकानात तर टी .वी नाही आणि सचिनचे तर शतक होत आहे! त्याच्या चेहऱ्यावरचा अस्वस्थ भाव माझ्या आईच्या लक्षात आला. आणि तिने त्याला सचिनचे शतक होईपर्यंत घरी थांबायला सांगितले. हे ऐकून प्रथम वाटणारा संकोच समोर सचिन असल्यामुळे निघून गेला आणि तो आमच्या बरोबर सामना पाहत बसला. मात्र ९० चे  १०० होईपर्यंत सचिनला थोडा वेळ लागला. तोपर्यंत आपला मुलगा कुठे गेला ह्या काळजीत इस्त्रीवाला आमच्या घरी आला आणि बघतो तर मुलगा जमिनीवर बसून टी. वी बघतोय! इतकेच नव्हे तर आईने दिलेली बिस्किटे पण खातो आहे. " देखने दो उसको.. सचिन की  सेंच्युरी हो रही  है....", बाबा म्हणाले. इस्त्रीवाला पण थांबला. शेवटी सचिनचे शतक झाले आणि त्याचे भाव टिपण्यासारखे होते! एवढेच काय नंतरची एक ओवर सचिनने मारलेले चौकार एन्जोय करत तो त्याच्या बाबांबरोबर परत गेला. त्यादिवशी आम्हाला सर्वांना खिळवून ठेवणारा घटक हा 'सचिन तेंडुलकर' होता. अशा किती लोकांना - बऱ्याचद एकमेकांना ओळखत नसून सुद्धा - त्याने जोडून ठेवले असेल ह्याला गिनती नाही! बस मध्ये जा, ट्रेन मध्ये जा, टपरी वर उभे रहा, नाक्यावर फेरफटका मारा... त्याचा विषय निघाला की सगळे एकमेकांचे मित्र होऊन जायचे!
   
आठवून बघा ना! तुमच्या शहरातील किंवा गावातील टी. वी शोरूम. सचिन खेळतो आहे. १०० गाठायच्या जवळ आहे. समोर तोबा गर्दी. शोरूम चा मालक पण आनंदाने हे सारे बघू देतोय. आणि शतक झालं की टाळ्या! माझ्या लहानपणापासून मी हे सारे बघत आलो आहे. तुम्ही देखील अनुभवलं असेलच!


आमचे आई-वडील किंवा आजी-आजोबा आमच्या पिढीतील गोष्टींची सतत त्यांच्या पिढीशी तुलना करायचे. अजूनही करतात. म्हणजे, रफी आणि किशोर सारखं तुमच्याकडे कोण आहे? आमच्या पिढीत  लेखक झाले तसा एक तरी आहे का तुमच्यात? सिनेमे, संगीत, अभिनेते, साहित्य, महागाई, शिस्त काहीही घ्या! सगळ्यांची तुलना होते! पण एक घटक आम्हाला ह्या सर्व पिढ्यांशी जोडून ठेवून होता - सचिन. मग चेंबुरला राहणाऱ्या माझ्या एका आजीचे, " सकाळी लवकर उठव ग.. सचिन आला आहे खेळायला ( ऑस्ट्रेलिया आणि न्यू-झीलंड मधल्या त्या सकाळी लवकर उठून बघितलेल्या टेस्ट्स आठवा..).. ", असे माझ्या आईला सांगणे असो किंवा " सचिनची सेन्चुरी झाली", अशी मी शाळेतून घरी येताना दारात उभं राहून माझ्या आजोबांनी केलेली घोषणा असो! मामाकडे गेलो आणि सामना सुरु असेल तर सचिनला दाद देताना माझ्या आजीचे भाव अजून लक्षात आहेत! पण सचिन आउट झाला की आजीला चेहऱ्यावरची नाराजी लपवता यायची नाही! मग किंचित हसून, जराशी मान हलवून ती आत निघून जायची की मग बाहेर यायचीच नाही! आई, बाबा सुद्धा घरी आले की दारातच उभं  राहून टी. वी  कडे बघत . , " सचिन आहे ना ... हुश्श " असं म्हणून त्या क्षणी निश्चिंत होऊन आत शिरायचे. प्रत्येक घरातील, प्रत्येक घटकाच्या आणि प्रत्येक पिढीच्या अपेक्षांचे ओझे वाहत हा माणूस गेली २३ वर्ष स्पर्धा करतो आहे - अर्थात स्वतःशी! आणि ह्या स्वतःची असलेल्या स्पर्धेमुळे तो आज क्रिकेटचा ध्रुव झाला आहे. १३-१४ वर्षांच्या वयापासून प्रोफेशनल आयुष्य सुरु केलेल्या ह्या व्यक्तीला ना कधी मित्रांबरोबर पाणीपुरी खायला मिळाली असेल ना मित्रांबरोबर पिक्चर बघायला जाण्याचा योग आला असेल! प्रसिद्धी मिळाल्या नंतर तर बायकोला साधे फिरायला घेऊन जाणे सुद्धा कर्मकठीण! लोकांसाठी समर्पित आयुष्य हे आतून किती एकाकी असते ह्याचेच हे उदाहरण आहे! अशावेळेस ह्या 'माणसाला' मानसिक स्थैर्य कुठे मिळत असणार? सचिन अमुक एका बाबाचा भक्त आहे ह्यावर त्याचा वारंवार समाचार घेणाऱ्यांनी त्याची ही बाजू जरूर विचारात घ्यावी. 

सचिनला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता किती लाभली आहे हे देखील आपण अनुभवले आहेच. म्हणूनच तो जेव्हा ऑस्ट्रेलियात खेळायला मैदानात उतरायचा तेव्हा तिकडचे लोक ' you are a legend ' असे कोरस मध्ये गायचे. जगातील प्रत्येक मैदानात तो आला की लोकं उभी राहून टाळ्या वाजवतात. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला आहे. अमेरिकेत असताना मॉटेल मध्ये काम करतानाचा अनुभव घ्या! दोन ऑस्ट्रलियन मुली मॉटेल मध्ये आल्या. बोलता बोलता मी कुठून आलो आहे हे विचारले आणि भारत हे कळताच त्यातील एक एकदम उद्गारली, " Ohh .. from the land of Sachin Tendulkar!" आणि नंतर तिने मला सचिन तिला का आवडतो.. त्याचा खेळ किती 'handsome ' आहे वगेरे सांगितले. ' पण तो आमच्या विरुद्ध खूप चांगला खेळतो...' अशी खंत पण व्यक्त केली! पण शेवटी गंभीर आवाजात हे देखील म्हणाली, " But his conduct ... exemplary !" असाच अनुभव आत्ता सुरु असलेल्या 'Hyatt ' च्या नोकरीत पण आला. एक इंग्लिश पाहुणा घाई घाई ने ऑफिस मधून  IPL चा सामना बघायला आला आणि '  I started my day early today so that I could come back early and watch Sachin bat ' असं आल्या आल्या घोषित केलं! एका दक्षिण आफ्रिकन पाहुण्याने स्वतःच्या मुलाला, " This is Mumbai ...the city of Sachin Tendulkar ' असे सांगितल्याचे आठवतंय! किंवा एकदा एक ऑस्ट्रेलियन पाहुणा बिल भरायला आलेला असताना आणि  मी त्याच्या क्रिकेट टीम ची स्तुती करताना, " But you have Sachin Tendulkar ' असं म्हणाल्याचे स्मरते!  


अशी किती उदाहरणे देऊ? त्याच्या रेकॉर्ड्स बद्दल काय बोलावे? ते तर तो सर्वश्रेष्ठ आहे हे पटवून देतातच. जगाच्या प्रत्येक देशात जाउन आणि प्रत्येक संघाविरुद्ध त्याचे शतक आहे हे मी कितव्यांदा सांगू? त्याच्या कारकिर्दीत सर्वात बलाढ्य असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध त्याचा सर्वात चांगला रेकोर्ड आहे ह्यातच सारे आले! पण हा झाला बऱ्यापैकी 'राजमान्यतेचा' भाग! क्रिकेटचे पंडित ह्या गोष्टीवर बरेच 'चघळकाम' सुरु ठेवतील. खुद्ध विस्डेन आणि ब्रॅडमन ह्यांनी घोषित केले असलं तरीही तो श्रेष्ठ कसा नाही असले 'पुरावे' मांडणारे लोक पण आपल्याला भेटतील! पण तो 'लोकमान्य' कसा आहे ह्याचीच ही उदाहरणं आहेत! मी, वानखेडे मधला तो हवलदार, आमच्या आजी-आजोबांची पिढी, इस्त्रीवाला आणि त्याचा मुलगा, त्या अनोळखी ऑस्ट्रलियन मुली, पान टपरी वर 'स्कोर कितना' असं  विचारणारे आणि सार्वजनिक ठिकाणी 'त्याची' चर्चा करणारे ह्यात काय  समान आहे? तर आम्ही सर्वांनी सचिन अनुभवलाय! आणि त्यात आम्हाला असीमित आनंदाचे दालन उघडे करून  मिळाले आहे! 
         
माझ्याच काय पण त्या वेळेस जन्म झालेले सर्व जण मोठे होत असताना त्याची फलंदाजी साथीला होती. नव्हे, आयुष्यातला एक घटक होती! आमचे वय वाढत होते... तो मात्र तरुण होत होता. वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने २०० धावा काढून  रेकोर्ड बनवले ह्यातच मी काय म्हणतोय ते आले.  माझ्या शाळेतल्या प्रत्येक वाढत्या वर्गात त्याच्या कुठल्या न कुठल्या शतकाची किंवा विक्रमाची चर्चा झाली आहे.  मी १९९६ साली श्रीलंके विरुद्ध वर्ल्ड कपच्या  उपांत्य  फेरीत त्याची एकाकी अपयशी झुंज बघून खूप रडल्याचे आठवते. १९९८ साली सहावीत असताना शारजाला त्याला वॉर्नला नमवताना कसे विसरणार?  मी दहावीची परीक्षा दिली तेव्हा त्याने २००३ च्या वर्ल्ड कप  मध्ये पाकिस्तानला नमवून अख्तर, अक्रम आणि वकार ह्या तिघांना लोळवले. २००५ मध्ये बारावीत असताना पाकिस्तान मध्ये जाउन तिथे ठोकलेली शतकं  विसरणं तर निव्वळ अशक्य!  अशी किती उदाहरणं  देऊ? कुठल्याही सामन्यात तो खेळला, त्याचे  शकत झाले की संध्याकाळी बिल्डींगच्या खाली क्रिकेट खेळताना आम्ही अधिक प्रसन्न आणि अति उत्साहात असू!  आम्हीच काय, सगळ्या देशाची अशी परिस्थिती होती! म्हणूनच अमिताभ बच्चन म्हणतो ना - " जेव्हा सचिन खेळतो तेव्हा बँकेचा कॅशियर सुद्धा खुश असतो आणि आपल्याशी चांगला व्यवहार करतो." पानवाल्याच्या टपरीवर कुणी स्कोर विचारी, " सचिन का कितना हुआ?" तेव्हा शंभर हे उत्तर असले तर उत्तर देणाऱ्या पानवाल्याचे आणि ते ऐकणाऱ्याचे एक्स्प्रेशन्स आठवा! असा सर्वांना आनंद देणारा कलाकार होता हा! हो, कलाकारच! कारण, जसे पु. लं  म्हणतात की , ' १००% लोकांना एकाचवेळी दिव्यत्वाचा साक्षात्कार करून देते ती कला!'


आणि कला हरण्याच्या आणि जिंकण्याच्या पलीकडे असते. त्यामुळेच बघा ना! भारत हरला आणि सचिनने शतक मारलं तरी आत मनातून  'तो खेळला' ह्याचे समाधानच  आपल्याला वाटत आलेलं  आहे. कारण त्याचे खेळणे ही  निव्वळ एक आनंदाची स्थिती होऊन जाते. त्याच्या इतके प्रेम त्यामुळे इतर कुणालाच मिळालेले नाही. आणि मिळेल असे वाटत देखील नाही. कारण तो सचिन होता!   


- आशय गुणे :)

Wednesday, December 5, 2012

A Letter to the Prime Minister

This article was published in 'Viewspaper' - the leading online youth paper. Glad to share it here...
 


6, Shri Balaji Society,
Pioneer Area,
Panvel – 410206
Maharashtra

Dear Mr. Prime Minister
My chest swells with pride as I write to a leader of your stature and also to the leader of the largest and arguably, one of the most diverse democracies of the world!

I was born in 1987 and started my life much around the same time when you opened up the economy of this country. And that is the reason I relate my growing up with the growth of this country. Having lived in a bubbling town near Mumbai, I have witnessed the landline telephone getting installed in my house as well in all the houses around me! I have seen multi-national brands setting their feet in this country. I saw the decline of bicycle riders and the surge of motor cycles and two-wheelers on the streets.  As I grew up I saw my little town setting its sight to become a city and cities setting their aims for a Metropolis!

However in this rapid surge towards development we also experienced an extreme neglect in terms of city/ town planning. Haphazard acquisition of land resulted in a complete mismanagement in terms of housing projects. Buildings were constructed almost everywhere, at times forcing the roads to be trimmed! Many open spaces were hijacked. Playgrounds vanished. Gardens are on the verge of getting extinct! The landscape of the city today mostly constitutes vehicles parked on both sides of the road. A poorly planned and carelessly space-crunched city – this was not the concept of the city/ town with which we grew up!  The cities in most of the developed countries are planned to the extent of having lawns along the road side, along the buildings and around every possible raised structure.  These lawns help in absorbing the dust in the air and as a consequence further help in keeping the air clean! Unfortunately in our country, this is not the case. A large quantity of dust always occupies the Indian landscape. A frequent construction activity, owing to the developing nature of the cities, adds a heap to this every minute. An average urban Indian commuter is thus exposed to dust every single minute he spends on the road. As a result, we are generating a tired workforce for the nation. Lack of proper infrastructure adds to the exertion! Is the Indian workforce more tired and health-compromised than the other counterparts?  If we wish to increase the productive output of this country, we should not compromise with the health of the country’s workforce! Unfortunately in India and especially in the cities, the workforce at the end of the day is a tired lot. On the other hand, a constant decline in the playgrounds and gardens of the city would result in discouraging the attitude of sports in the children. How strange would it be for a kid to practice in an indoor sports academy and all of a sudden represent his country in an outdoor stadium? A growing city should have enough lawns, gardens, libraries, playgrounds, auditoriums. However what we are seeing in our city is a surge in housing projects and nothing more than that! I first request to you, Honourable Prime Minister, is to look into generating planned cities. How will a city without playgrounds, gardens, libraries, auditoriums, museums contribute in the all round development of its citizens? It will just be, I am afraid, a hub of monetary transactions!

As I grew up, I must admit, there was a huge change in the connectivity across cities. A journey from my place to Pune began taking 3 hours from the previous duration of 4-5 hours. Train services improved. And we began going places. Our visits were not only restricted to nearby cities for a cool vacation but they also included some distant villages. Our textbooks said that India’s life lay in its villages! But the experience of village life in most (if not all) villages was that of a delusion, disappointment and utter embarrassment! Whenever our car approached a steep turn, I could see some hurried movement of people around that turn. A close look at those people made us realize that they were defecating in public! My head hung in shame when I conversed with one of villager about this. There is no adequate toilet facility in most of the villages in India. And even if they have some, no drop of water is made to reach those. Bluntly speaking, these villagers pray that no vehicle negotiates ‘that turn’ during their turn. And this ‘alertness’ is a part of their life now!  One of your ministers rightly said that India needed more toilets than temples. But he was criticized for hurting the sentiments of people in India, making it clear how this issue is handled in India! This example is just a start to stress on the extreme urban-rural divide this nation faces today! And this is my second request to you, honourable Prime Minister! Bridge the gap between these two Indias!

We entered college when there were talks of India becoming the next big thing in the world!  These talks made us happy. We felt proud of the stature this country was going to attain after 60 years of its independent existence!  India had a global presence. The World listened to her voice. Our brands bravely acquired foreign brands. Our industrialists expanded their bases and crossed the Indian shore. However, we at college were clueless about how we could contribute in this modern India! Colleges and Universities for us continued to be ‘degree- churning’ institutes and places where the education we took was in no relevance to the existing market around us!  Every talk of higher studies made us think of either the United States or the United Kingdom! Australia and Russia also entered the Indian higher education landscape but we never believed in our own country – neither have we done it now! Also, a scarcity of quality research institutes and a lack of innovative education and research exposure at the college level is the main reason for this brain drain! Like my fellow countrymen, I too wonder how India could be called a superpower when most of its talent pool is not in the country. Current superpowers do not have their talent outside the nation, do they? In fact they attract a lot of talent from outside. When will India reach this stage? Or is India destined to become a superpower based on its purchasing power and per capita consumption san the innovation and talent? Ground level reform in the education system is thus my third request to you!

And today as youth of this country, we see a second phase of transition in India. Your government is soon to allow 49% FDI in India. A second wave of economic reforms will sweep the nation. Will India be more globalized? Will the landscape of Indian market change completely? While the details of economics are not known to commoners like me, I am aware that most of the Indian population still thrives on the local market. This market, though at times largely unregulated as per market standards otherwise, has been a support system for the nation since time immortal! Breaking this will result in breaking the backbone of this country. Moreover, the world has seen a collapse of the middle class in the developed countries due to exceeding ‘global tending’ policies! And we would definitely not want that to happen in this country. Imagine the country with only the ‘haves’ and the ‘have nots’!  Hence I request you, Mr. Prime Minister, to have a global – local equilibrium in all the economic policies henceforth. Because it is ‘now or never’ for India in this phase of transition! And I have faith in the economist in you.

I am aware that the points I have presented cannot magnify to the larger picture of the problems of this country. But I am sure, we all will relate these problems somewhere to the problems we encounter daily.


Jai Hind !

Aashay Gune


This article can also be viewed at : http://theviewspaper.net/aashay-gune-writes-a-letter-to-prime-minister/

डॉ . प्रभुणे

ही  कथा 'मायबोली' ह्या दिवाळी अंकात (online) प्रकाशित झाली होती! 

बरोबर एक मोठा बुके आणि थोडी चॉकलेट्स घेऊन मी, माझी पत्नी, आणि माझा ८ वर्षांचा मुलगा ड्राईव करत चाललो होतो. बाल्टिमोर काऊंटीमधील शांत परिसरात गाडी वेगात पळत होती. तितक्याच वेगात आमचा उत्साह आणि आनंद देखील वाहत होता. प्रसंगच तसा होता. नुकतेच नोबेल पारितोषिक विजेते घोषित झाले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जगातील मान्यवरांची ओळख हळू हळू होऊ लागली होती. अमेरिकेत जे थोडे लोक पेपर वाचतात, त्यांच्यात आम्ही देखील असल्यामुळे रोजचे लेख आम्हाला काय ती माहिती पुरवीत होते. ह्या सार्‍या यादीत एका त्रिकुटाचा समावेश होता. हे त्रिकुट होते शास्त्रज्ञांचे. जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीमधील मेडिकल सायन्स शाखेतील एका मोठ्या प्रयोगाने मागच्याच वर्षी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मानवी शरीरातील पेशींमधील (cells) 'डीएनए'वर हे संशोधन होते. पेशींच्या एका विशिष्ठ भागात, ज्याला न्युक्लिअस म्हणतात, हे डीएनए असते. या डीएनए चे प्रोटीन नामक सत्वात रुपांतर होते आणि पुढे हेच प्रोटीन आपली शारीरिक वाढ किंवा जडणघडण होण्यास कारणीभूत ठरते. परंतु इतके दिवस पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असू शकते याचा कोणालाच पत्ता नव्हता. शास्त्रज्ञांच्या या त्रिकुटाने एका मोठ्या प्रयोगाची मदत घेऊन हे शोधून काढले की पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असते आणि त्याचे रुपांतर शरीरातील महत्त्वपूर्ण प्रोटीनमध्ये होते. या त्रिकुटात एक भारतीय नाव झळकल्याचे आमच्या ऐकण्यात आले होते. आणि सहज त्या दिवशी पेपर उघडला तर काय आश्चर्य! दोन अमेरिकन शास्त्रज्ञ मंडळीत एक नाव "तिचे" होते. लगेच येणार्‍या शनिवारचा मुहूर्त धरला. ( इकडे मुहूर्त ही कल्पना म्हणजे विकेंड! आणि केवळ विकेंडच..) आणि आम्ही सारे तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला निघालो.

सहा वर्षांपूर्वी शिकागो सोडून आम्ही बाल्टिमोरला स्थाईक झालो. नवीन शहरी जातानाची एक सवय अमेरिकेत पाऊल ठेवल्यापासून कायम होती. तिकडे असलेल्या भारतीय लोकांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवायची. आपला एकूण देश अनेक राज्यात विभागला गेल्याचे आपल्या भूगोलाच्या पुस्तकानेच लहानपणी मनात ठसवल्यामुळे या भारतीयांमध्ये मराठी कोण हे सुद्धा बघणे आलेच. आमचा मुलगा, त्याचा जन्म इकडे झाल्यामुळे अनेक 'रंगांमध्ये' लीलया मिसळू शकत होता! आमचे तसे नव्हते. तर सहज लिस्ट चाळत होतो तर हिचे नाव त्यात! नाव वाचून आश्चर्याचा धक्काच बसला. हीच का ती ह्याची खात्री करायला इ-मेल पाठवला तर तीच निघाली! आणि मुख्य म्हणजे तिने मला ओळखले होते. बाल्टिमोर मध्ये कधीही येशील तेव्हा घरी ये असा संदेश तिने लगेच पाठवला! आणि पुढे वाचले तर 'सिनिअर सायंटिस्ट, जॉन हॉपकिन्स' असे तिचे डेसिग्नेशन वाचले तेव्हा थक्क झालो! खूप प्रगती केली होती तिने. स्वतःचे क्षेत्र गाजवले होते!

वास्तविक मी हिचा विद्यार्थी. बायोटेक हे क्षेत्र भारतात नवीन आले तेव्हा ह्यात खूप स्कोप आहे असे ऐकून आम्ही त्यात उडी घेतली होती. दुसर्‍या वर्षी शिकत असताना ही आमच्या कॉलेज मध्ये शिकवायला जॉईन झाली. पीएचडी संपवून आणि थोडा फार रिसर्च करून ती प्रोफेसर म्हणून रुजू झाली होती. तिचे वय तेव्हा २६ होते. एक अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय प्रोफेसर अशी तिची ख्याती होती. त्यामुळे आम्हा मुलांचं (आणि मुलींचं सुद्धा!) तिच्याशी काही फार जमायचं नाही. मुली देखील तिच्या समोर नोट्स काढायचा आव आणत असल्या तरी तिच्या मागे (आणि मागेच!) तिचा समाचार घ्यायच्या. काही मुलांची तर तिच्याशी वादावादी झाली होती. वर्गात जोरजोरात भांडण होणे बाकी ठेवले होते काहींनी! हिने तिच्या आयुष्यात शिस्तीला खूप महत्त्व दिले होते पण आमच्यावर ती शिस्त लादताना गफला व्हायचा!

"हिचे अजून लग्न झाले नाही ना! म्हणून ही सदैव रागात असते... हिला कुणीतरी नवरा आणून द्या रे!" - तिच्या शिस्तप्रिय स्वभावाचे आणि तो आमच्यावर लादल्याचे खापर तिच्या अविवाहित राहण्यावर फोडले जायचे. तिचा विषय निघाला की हे वाक्य हमखास बोलले जायचे. संभाषणात सर्वप्रथम तिच्या उच्च शिक्षणावर जोर दिला जायचा. आश्चर्य व्यक्त केले जायचे... क्वचित आदरभाव सुद्धा! पण तिचे लग्न नाही झाले ह्या विषयावर येऊन सगळं संपायचं! काळजीच होती जणू सार्‍या मुलांना हिच्या लग्नाबद्दल! पुढे आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि आमच्यापैकी बर्‍याच लोकांना असा साक्षात्कार झाला की आम्ही निवडलेल्या क्षेत्राला अजिबात स्कोप नाही! आणि सर्व क्षेत्रांचा शेवट ज्या एका पदवीने होतो तेच आम्ही केले - एमबीए! पुढे नशीबाने चांगले दिवस दाखवत एक चांगली नोकरी दिली. आणि त्याचे पेढे द्यायचे म्हणून मी आमच्या या आधीच्या कॉलेज मध्ये गेलो. तेव्हा समजलं की ही अमेरिकेला जायचे म्हणून प्रोफेसरगिरी करून पैसे जमवत होती. पोस्ट-डॉक करण्यासाठी. आम्ही थक्कच झालो होतो!

"अजून किती शिकायचे माणसाने! आता बास ना", इथपासून, "लग्न काय अमेरिकेत जाऊन करणार काय? नक्कीच कुणीतरी गोरा पकडेल... दिसते तर माल एकदम" इथपर्यंत सारी वाक्यं बोलली गेली होती.
अजून काही वर्ष गेली आणि मला अमेरिकेत पाठवले गेले. २८ व्या वर्षी ही संधी आल्यामुळे घरचे एकदम खुश होते. आता मला कुणीही मुलगी देईल ही त्यातली एक भावना. आणि झालेही तसेच. लग्न करून मी अमेरिकेत गेलो.

बाल्टिमोर मध्ये आल्यावर लगेच काही हिची भेट झाली नाही. तिकडच्या महाराष्ट्र मंडळात गेलो तेव्हा मात्र तिच्याबद्दल थोडे ऐकले. "तिचे काय... नाव भारतीय आहे फक्त... बाकी काय भारतीय आहे तिच्यात?" असे एक वाक्य एका गृहस्थाने बोलून दाखवले होते आणि सर्वांनी एकमताने हसून त्या माणसाला दाद दिली होती. ती ज्येष्ठ शास्त्रज्ञ असल्यामुळे खूप व्यस्त असायची. त्यामुळे आल्यापासून २-३ आठवडे काही भेट होऊ शकत नव्हती. शेवटी तिनेच एकदा रविवारी बोलावले. आणि जवळ जवळ १५-१६ वर्षांनी डॉ. सुलभा प्रभुणे हिला भेटलो. जवळ जवळ ४५ वर्षांच्या डॉ. प्रभुणे मध्ये लक्षणीय बदल झाला होता. पंधरा वर्षांपूर्वी खांद्यापर्यंत येणार्‍या केसांचा बॉय-कट झाला होता. चेहर्‍यावरचा चष्मा जाड भिंगांचा झाला होता. केस बर्‍यापैकी पिकले होते. आणि चेहरा थोडासा का होईना सुरकुतलेला दिसत होता. तिची इकडची प्रगती ऐकून आणि पंधरा वर्षांनी परत एकदा थक्क होऊन मी घरी गेलो. पोस्ट-डॉक करायला आलेल्या तिने खूप चांगला परफॉर्मन्स देऊन आणि अनेक रिसर्च पेपर प्रकाशित करून बढती मिळवली होती. आणि ५ वर्षांपूर्वी स्वतःची प्रयोगशाळा सुरु केली होती.

"मग, या कधी आमच्याकडे!" मी म्हणालो. "या म्हणजे कोण आता?" तिने एकदम विचारले. "म्हणजे तुम्ही सगळे..." मी पुढे बोलणार इतक्यात तीच म्हणाली. "फॅमिली वगेरे कुणीही नाही इकडे... मी एकटीच राहते... मी लग्न नाही केलं!" थक्क होण्याचे कारण फक्त तिचे उच्च शिक्षण एवढेच नव्हते हे वेगळं नको सांगायला!
आल्यापासून ३-४ वर्षात मी मात्र जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस तिला विकेंडला घरी बोलवायचो. ओळख अजून वाढू लागली. आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये कसे झाले कळले देखील नाही. इतके दिवस 'अहो-जाहो' करणार्‍या मला शेवटी तिने 'अरे-तुरे' ने हाक मारायला सांगितली. कॉलेज मध्ये तशी हाक आम्ही मारत होतोच... अर्थात तिच्या पाठीमागे. आता मात्र तिला अशी हाक मारायची परवानगी खुद्द तिनेच दिली.

क्वचित कधीतरी ती महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना किंवा माझ्या घरी ठेवलेल्या कार्यक्रमांना यायची. तेव्हा सुद्धा स्वारी एकटीच. जास्त कुणी तिच्याशी बोलायचे नाही. मंडळाचे कार्यक्रम झाले की ही एकटीच निघून जायची. मी माझ्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात उभा असलो तर आमच्यात न येता एकटीच घरी जायची. जर मी एकटा असलो तर मात्र मला भेटून, चार शब्द बोलून घरी जायची. क्वचित हिच्याशी आणि माझ्या मुलाशी पण बोलायची. पण एकूण सगळं एकट्यानेच! खरं तर तिचे रुटीन खूप व्यस्त असायचे. सकाळी लवकर लॅबमध्ये जायची. आणि रात्री यायला ९-१० वाजायचे. कधी कधी विकेंडला पण जावे लागायचे. त्यामुळे एकूण बिझीच!

दरम्यान मला हिच्याबद्दल जे मत ऐकायला मिळत होते ते काही फार चांगले नव्हते. बाल्टिमोर काऊंटी मध्ये बर्‍याच वर्षांपासून राहणार्‍या एका गृहस्थाने हिला म्हणे वेगवेगळ्या गोर्‍या लोकांबरोबर फिरताना बघितले होते. लेट-नाईट पार्टी करताना ती बर्‍याचदा दिसली होती. हिच्या घरी बर्‍याचदा कोणीतरी यायचे. मला देखील हिच्यापासून सावध राहायला सांगितले गेले. मुलांना तर लांबच ठेवा असा पण सल्ला देऊन झाला होता! ही बाई एकेकाळी माझी शिक्षिका होती ही गोष्ट मी ह्यांच्यापासून लपवून ठेवली होती. तिने सांगायचा तर प्रश्नच नव्हता! तिच्याशी बोलताना एवढे सुद्धा समजले होते की ही बाई बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा भारतात गेली होती. तिने सांगितलेले साल म्हणजे ती साधारण ३३ वर्षांची वगैरे असली पाहिजे. त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत काही ती भारतात गेली नव्हती. भुवया उंच करायला लावणारी केस होती हिची हे मात्र खरं!

मी इकडे आल्याच्या वर्षभरातच तिची स्वतःची प्रयोगशाळा सुरु झाल्यामुळे तिकडे होणार्‍या गोष्टी माझ्या कानावर यायच्या. आणि खूप वर्षांपूर्वी पदवी बायोटेक मध्ये मिळवल्यामुळे तेव्हा असलेल्या शिक्षिकेकडून त्याची उजळणी देखील होत असे. तिचे विचार संशोधनात अंमलात आणण्यासाठी एक चांगली टीम तिच्याकडे होती. पीएचडी करायला आलेले विद्यार्थी हुशार होतेच शिवाय पोस्ट-डॉक वाले लोक सुद्धा खूप मेहनती आणि सर्जनशील होते. त्यामुळे संशोधनातील हिच्या विचारांना चांगले पाठबळ होते. आणि त्यामुळे परिणाम चांगले मिळायचे. डॉ. प्रभुणे हे एक प्रभावी नाव झाले होते. दर वर्षी रिसर्च ग्रँट मिळणार्‍या शास्त्रज्ञ मंडळींमध्ये हिचे नाव होते. पण आमच्या लोकांकडून एकूण हिच्या कामगिरीची तेवढी दाखल घेतली जायची नाही एवढे मात्र खरे. कुठल्यातरी गाण्याच्या किंवा वाजवण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन जिंकलेल्या लोकांचा सत्कार होत असे. मात्र मी ३ वेळा सत्कारासाठी हिचे नाव पुढे केले तेव्हा तिन्ही वेळेस मला वेड्यात काढून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला होता!

मात्र तिच्यामुळे जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटी बघायची संधी मात्र मिळाली. नुसती नाही तर अगदी आतून. एरवी, जगाला जवळ जवळ ४० नोबेल पारितोषिके मिळवून देणारी ही 'पवित्र' वास्तू अगदी आतून बघायचे भाग्य कुणाला मिळेल? सतत काहीतरी नवीन शोधण्याच्या मागे असलेले हे इथले शास्त्रज्ञ बघितले की आपण एका वेगळ्याच विश्वात आहोत ह्याची नक्कीच खात्री पटते! बाहेर जगात काय चालले आहे ह्याची फारशी पर्वा न बाळगता, एकाग्रतेने इकडे काम सुरु असते. सतत त्याच विश्वात राहून आणि त्याच विश्वात राहण्यासाठी पोषक अशा वातावरणात नांदून उत्कृष्ट शोध लागतात! आणि त्यामुळे एका अर्थाने जग चालते. ती पण त्याच जगातली. भारतातून एक ध्यास मनात बाळगून आली होती. आणि तिने ठरवलेल्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल केली ह्यावर, मिळालेल्या नोबेल पारितोषिकाने शिक्कामोर्तबच केले होते!

घराची बेल वाजवली. आणि पुढच्या अर्ध्या तासात एका आश्चर्यचकित करणार्‍या उत्तराला मला सामोरे जावे लागले. बुके दिला. आनंदाने चॉकलेट्स देखील दिली. आणि अभिनंदन करणे सुरु केले. बोलताना पुढे म्हणालो. "घरी फोन केलास की नाही? खूप खूष असतील ना सगळे?" उत्तर निर्विकारपणे नाही असं आल्यावर मात्र मी एकदम आश्चर्य व्यक्त केले. आणि "फोन कर गं" असं तिला एक-दोनदा सांगितले. शेवटी तीच म्हणाली.
"मी माझ्या घरच्यांशी संबंध तोडून टाकले आहेत. त्यांना माझ्या यशाविषयी किंवा एकंदर आयुष्याविषयी काहीही घेणंदेणं नाही!"
"अगं पण का? असं कसं?"
TichiKatha.gif
"हो मग काय... त्यांना काहीच पडलेली नाही. मी त्यांच्यासाठी मेले आहे. भारतात अजून पुरुषच शास्त्रज्ञ होत असतात. सर्वांचा विरोध पत्करून मी इकडे पोस्ट-डॉक करायला आले. बाबांनी शेवटी एका अटीवर परवानगी दिली. २ वर्षात घरी परत येऊन लग्न करायचे. दोन वर्षाच्या पोस्ट-डॉक ने काय होणार आहे? ती तर शास्त्रज्ञ बनण्याची सर्वात पहिली पायरी आहे... त्यांना कुठे माहिती होते की पोस्ट-डॉक निदान पाच वर्ष केलं की पुढे असोसिएट प्रोफेसर होता येतं... आणि मग पुढे बढती मिळवत मिळवत सायंटिस्ट होतो माणूस! भारतात एवढेच वाटते की पीएचडी केली की माणूस शास्त्रज्ञ होतो! त्यामुळे... ह्या असल्या प्रस्तावाला काहीही अर्थ नव्हता... मला शास्त्रज्ञ व्हायचे होते... आणि मी अजिबात भारतात गेले नाही. परंतु काही वर्षांनी एकदा मी सर्वांना भेटायला परत घरी गेले... तेव्हा माझ्या नावावर ४ रिसर्च पेपर होते... आणि नामांकित जर्नल्स मध्ये माझे नाव छापून आले होते. मला हे सर्व घरी सांगायचे होते... पण घरी गेले तर ... लग्न... लग्न आणि केवळ लग्न! जर्नल वगैरे ठीक आहे... पण आता लग्नाचे बघा जरा, अशी सूचना मिळायची. नातेवाईकांमध्ये ह्याच्या आधी मुलगी किती हुशार आहे म्हणून मला मिरवले जायचे... पण आता त्यांच्याकडून सुद्धा लग्न करा लवकर... अशा सूचना!! शेवटी बरीच भांडणं करून... मी परत इकडे आले... ह्यावेळेस मात्र खूप त्रासले होते. वैतागले होते... रागावले होते. कुणालाच माझ्या कामाची कदर नाही हे मी जाणले होते... आणि त्याचाच सर्वात जास्त त्रास होत होता! त्यामुळे सुरुवातीचे काही महिने रिसर्च मध्ये लक्ष नव्हतं लागत... रिझल्ट नव्हते येत... कधी कुणी कौतुक केले की घरी सांगावेसे वाटायचे...परंतु ... काहीही उपयोग होणार नव्हता हे देखील माहिती होते! दरम्यान मला थोडेफार समजून घेणारे माझे कलीग्स होते माझ्या बरोबर... त्यांच्या बरोबर वेळ चांगला जाऊ लागला... ते मला समजू शकत होते... कारण ते सुद्धा शेवटी शास्त्रज्ञ होते... आणि ह्या एकटेपणाला सरावले होते. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाशी मी काही वर्ष रिलेशनशिप मध्ये पण होते... काही वर्ष परत एकटीने घालवली... परत एक कलीगशी ओळख वाढली... तो माझ्याने १५ वर्ष मोठा होता... परंतु मला समजून घ्यायचा... रिझल्ट आले नाही आणि मानसिक ताण वाढला की प्रोत्साहन द्यायचा... जवळ जवळ वर्षभर आम्ही एकत्र होतो... पण नंतर तो देखील पुढे दुसरीकडे निघून गेला... आम्ही आहोत अजून टच मध्ये म्हणा...! पण एवढ्यात झाले काय... की बाल्टिमोर मध्ये आमच्या ओळखीच्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत... त्यांनी कुणामार्फत तरी हे सारं घरी सांगितलं! बर्‍याच वर्षांनी घरून फोन आला... मी उचलला तर हे ऐकायला आलं... तुला असले धंदे करायला पाठवले नव्हते अमेरिकेत... पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नकोस... तू आमच्यासाठी मेलीस! ज्या लोकांना मी केलेल्या कामाचे कौतुक नाही... केवळ निंदाच करता येते... त्यांच्याशी मी तरी संबंध का ठेवू? परिस्थितीने मला अजून कठोर बनवले... आज मिळालेले नोबेल मी माझ्या परिस्थितीला समर्पित करते!"

घरी आलो होतो. बायको मुलाला झोपवून स्वतः कधीच झोपून गेली होती. माझ्या मनात मात्र विचारचक्र सुरूच होते. एका साच्यात आयुष्य जगणार्‍या आपल्यासारख्या लोकांना कळेल का हिची व्यथा? माणसाने शिकावे, मोठे व्हावे, योग्य त्या वयात लग्न करावे, संसार सुरु करावा... सर्व मान्य! परंतु हे आयडियल जगणे झाले. प्रोटोकॉल प्रमाणे! उद्या जर कुण्या एका ध्येयनिष्ठ व्यक्तीने एक अद्वितीय काम करण्यासाठी ही चौकट ओलांडली तर? त्या कामात झोकून देताना हे नियम बाजूला सारले तर? मनाने तो सज्ज होईल देखील! पण त्या वयात असलेल्या शारीरिक गरजा? किंवा कुणासमोर आपण केलेले काम व्यक्त करण्यासाठी त्यावर अवलंबून राहावे लागले तर? त्यातून रिलेशनशिप्स निर्माण झाल्या तर दोष कुणाचा? आणि ह्याला केवळ दोष मानून त्या माणसाला नाकारायचा अधिकार आपल्याला आहे? त्याला वाईट ठरवून वाळीत टाकणारे आपण कोण? घड्याळाच्या काट्याप्रमाणे जीवन जगणारी माणसं! त्यांना वेळ काळ झोकून काम केलेल्या लोकांबद्दल का असेल मग आस्था? इतर लोकांसाठी माहिती नाही... पण डॉ.प्रभुणे माझ्या नजरेत एकदम वरच्या शिखरावर आहे. स्वतःचे ध्येय प्राप्त केलेली एक यशस्वी स्त्री!


 (काल्पनिक)



-आशय गुणे


This story can also be read here:  http://vishesh.maayboli.com/node/1228

Image Credits: 'Maayboli - http://vishesh.maayboli.com/node/1228 

Monday, December 3, 2012

फिझिओथेरापिस्ट - भाग २


नीलमची डॉ. नीलम झाल्यापासून तिची ओळख आणि कदर ह्या दोन्ही गोष्टी वाढल्या होत्या. आता ती आमच्यात मिसळू लागली होती, गप्पा-गोष्टीत सामील होऊ लागली होती, चर्चा करू लागली होती आणि भारतातील ताजे किस्से देखील सांगू लागली होती. ( ती तशी हल्लीच भारताहून आली होती त्यामुळे देशात नेमके काय सुरु आहे हे तिच्याकडून ऐकण्यात मजा यायची.) सुरुवातीला एकटीने दिवस काढणाऱ्या नीलमला आता बोलायला माणसं मिळाल्यामुळे ती अगदी भरपूर बोलायची. कधी कधी दुसऱ्याचे वाक्य तोडून स्वतः मध्येच बोलायला लागायची आणि तिला हे लक्षात येताच खजील होऊन माफी मागायची. ग्रुप मध्ये राहणारी मंडळी इथलीच. त्यामुळे त्यांना तिची मनःस्थिती समजत होती. त्यामुळे ह्या सर्वांना त्याचे काहीच वाटायचे नाही. उलट, हसून सोडून द्यायचे सगळे! साधारण भारतीय ( मराठी म्हणूया आपण हवं तर..) ग्रुप्स मध्ये बोलले जाणारे विषय
आम्ही बोलायचो. त्यात राजकारण, क्रिकेट, भारतीय लोकांचं भारताबाहेर वागणं ( ह्यात प्रत्येकाकडे त्यांचे सोडून इतर सर्व भारतीय लोकांच्या बहुतांश वाईटच अनुभवांचे गाठोडे उघडले जायचे!) , संगीत,
महाराष्ट्र मंडळ ( आणि त्यातले रुसवे-फुगवे...) , नवीन सिनेमे, भारतीय सण, खाद्यपदार्थ आणि साजरे केलेले वीकेंड्स हे विषय प्रमुख्याचे. त्यातून ज्या कपल्स ना नुकतेच मुल झाले होते त्यांची ह्या मुला/मुली बद्दलची असंख्य कौतुकं आमच्या वाटेला यायची. त्यातून एकीच्या मुलाने काहीतरी करून दाखवले हे 'माझ्या मुलाने केव्हाच केले होते' असे सांगण्यात काही माता रमायच्या! पण ह्या साऱ्यांमध्ये डॉ. नीलम तिच्या मतांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घ्यायची. तिचे तरुण असल्यामुळे नवीन विचार बरीच वाहवा मिळवून जायचे.
मला आठवतंय, तेव्हा नुकताच क्रिकेटचा वर्ल्ड कप संपला होता आणि तो भारताने जिंकला होता. तेव्हा डोक्यावरचे केस पांढरे आहेत ह्याची साक्ष पटवून देणारे एक विधान ग्रुप मधल्या एका गृहस्थाने केले. " झाला वाटतं वर्ल्ड कप... आता मात्र त्या तुमच्या तेंडुलकर ने रिटायर व्हावे!" एवढे वाक्य पुरं व्हायच्या आधीच नीलम पेटून उठली. आणि तिने शेवटपर्यंत असे काही मुद्दे काढले की बोलणाऱ्या गृहस्थाला आपले विधान मागेच घ्यावे लागले! असाच एकदा 'आपल्या लोकांना शिस्त नाही' हा सर्वांचा आवडता विषय सुरु होता.
विषय रंगात आला होता. तेच ते नेहमीचे, आपण रस्त्यावर एका लेन ने कशी गाडी चालवत नाही इथपासून सार्वजनिक ठिकाणी आपण कसे आवाज कमी न करता बोलतो इथपर्यंत साऱ्यावर चर्चा झाली! इथे देखील डॉ. नीलम ने आपली मतं सांगायला सुरु केली.
" मला असं वाटतं की आपल्या बेशिस्ती चे मूळ आपल्या रोजच्या दिनक्रमात आहे. आपल्यापैकी किती लोक सकाळची सुरुवात लवकर उठून करतात? माझ्या पाहण्यात तरी इकडे फार म्हणजे फार कमी भारतीय लोक सकाळी लवकर उठताना दिसतात. भारतातले तर विचारूच नका.... त्या उलटं तुम्ही चाइनिज़, जपानी किंवा अमेरिकनच बघा ना! आमच्या शेजारी दोन चीनी विद्यार्थी राहतात... दुपारी १२:३० म्हणजे १२.३० ला जेवण झालेच पाहिजे. सकाळी लवकर उठून नाश्त्याच्या वेळेस नाश्ता होतो...आणि पुढे सारा दिनक्रम व्यवस्थित! इकडचे भारतीय विद्यार्थी जेवढे माझ्या ओळखीचे झालेत ...सर्व १० ला उठतात.... मग नाश्ता....दुपारचे जेवण ३ च्या सुमारास... आणि रात्री उशीरा पर्यंत कॉलेजच्या lab मध्ये काम करत बसतात... मग उशिरा झोपल्यामुळे परत दुसऱ्या दिवशी उशिरा... ..अहो, पण का? विशालला सुद्धा हि वाईट सवय आहे...रात्री रात्री पर्यंत कंपनीत बसावे लागते...मान्य....पण दिवसाची सुरुवात लवकर केली तर? काही बिघडणार आहे का? उलट कामं लवकर होतील सगळ्यांची. इतर गोष्टींना देखील वेळ मिळू शकतो ", ती म्हणाली.
"तू म्हणतेस ते काही चूक नाही... पण तुला एक सांगू...इकडे आपल्या लोकांकडून काम पण तितकेच केले जाते...भारतीय आणि चीनी तर ह्यांचे आवडते.. एवढ्या कमी पगारात अमेरिकन थोडी कामं करणार आहेत? " - एक अनुभवी गृहस्थ उद्गारला.
"कमी पगार! अहो काका, ५००० डॉलर काय कमी पगार आहे?" - नीलम.
" अगं, तू इथे हल्ली हल्ली आली आहेस .. कॅलिफोर्निया मध्ये ५००० पर्यंत पगार काहीच नाही... इकडची महागाई अनुभव.. मग तुला कळेल...अगदी छान आयुष्य जगायचे असेल ना... वीकेंडला मज्जा करायची असेल ना .. तर एवढा पगार अजिबात पुरेसा नाही...म्हणून अमेरिकन लोकं ह्या नोकऱ्या करत नाहीत... म्हणून मग ह्या लोकांना चीनी आणि भारतीय लोकांना नोकऱ्या द्याव्या लागतात ... आपलं कसं.. गुणिले ५० सदैव डोक्यात ... त्यामुळे आपण इकडे लाखभर रुपये दर महिन्याला कमावतो ह्याच मनःस्थितीत आपण काम करत असतो... हे सगळं असंच चालत राहणार... सर्वांच्या गरजा वेगळ्या... ", इकडे आयुष्य काढलेल्या त्या व्यक्तीने तिला समजावले.
नीलमला नंतर मी शहरातल्या एका लायब्ररीबद्दल सांगितले. बस ने अर्ध्या तासावर होती. त्यामुळे जाणे येणे सोपे होते. तिने देखील लायब्ररीबद्दल उत्सुकता दर्शवली. आणि काही महिन्यांमध्ये मला कळले की तिने ती लायब्ररी जॉईन सुद्धा केली आहे.
" बरं झालं तुम्ही मला लायब्ररीबद्दल सांगितलं ते.. आता माझा वेळ थोडा चांगला जाऊ लागला आहे... नाहीतर रोज सकाळी उठून घरातली कामं करायची, फेसबुकवर वेळ घालवायचा, जेवण करायचे मग दुपारी कधी डुलकी....कधी नेटवर पिक्चर बघणे....संध्याकाळी थोडा फेरफटका किंवा कुणाला काही दुखापत असेल तर त्यांची ट्रीटमेंट आणि घरी येऊन विशालची वाट बघणे ह्यात दिवस संपायचा ...आता निदान वाचायला तरी मिळते आहे... तेवढाच वेळ सार्थकी जातो ", नीलम म्हणाली. आज ती मला ग्रोसरी स्टोर मध्ये भेटली होती. माझ्यासारखीच भाजी घ्यायला आली होती.
" अरे वा... ट्रीटमेंट देणे सुरु आहे तर...चांगलं आहे.. चांगलं आहे... पण मग तू हे वाढवत का नाहीस? एवढी डॉक्टर झाली आहेस... तुझ्या ह्या फीजियोथेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ दे की...", मी सहज म्हणालो. माझ्या फिरतीच्या नोकरीमुळे मला काही विषयात कसे अज्ञान आहे हे मला पुढच्या काही सेकंदात कळले.
" अहो, मला बाहेर नोकरी करायला अलावूड नाही... कायद्याने त्याला परवानगी नाही... माझा dependent विसा आहे ना... विशाल नोकरी करतो आणि मी dependent !" तिला मग मी फेरफटका मारून यायच्या अजून काही जागा सांगितल्या. ४० मिनिटांवर असलेला zoo बघायला सांगितला किंवा तासाभरावर असलेले विद्यापीठाचे कॅंपस बघून ये असा सल्ला दिला. विशाल कामात बुडालेला असल्यामुळे गेले बरेच वीकेंड सुद्धा त्याला वेळ नव्हता मिळत. नीलम त्यामुळे एकटी फिरण्यात तशी एक्स्पर्ट झाली होती - सवयीने आणि परिस्थितीने! तिने लगेच होकार दिला. आणि एका शुक्रवारी बाईसाहेब डब्यात sandwiches भरून आणि हातात कोकची बाटली मिरवत university बघायला गेल्या देखील! त्याचा सविस्तर वृत्तांत मला दोन आठवड्यानंतर एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या आधी मिळाला. सुरुवातीला धन्यवाद वगेरे देऊन झाला आणि मग मीच विचारलं.
" काय, कशी वाटली university ?"
" खूप छान! मला वाटलं नव्हतं इथल्या मुलांना एवढं बागडायला मिळत असेल.... ह्यांच्याकडे बघून वाटतं आपण काहीच केलं नाही आयुष्यात! चार भिंतीच्या आड शिक्षकांच्या धाकात शाळेचं आयुष्य गेलं माझं! कधीतरी आठवड्यातून एकदा खेळायला घेऊन गेले तर गेले... कॉलेज मध्ये तर साधं मैदान सुद्धा नव्हतं आमच्या इथे! कधीतरी लहर आली की लायब्ररीत घेऊन जायचे.... तिकडे सुद्धा आमच्या समोर एक पुस्तक ठेवले जायचे... आणि नंतर ते परत घेतले जायचे! खेळायची आणि वाचायची सवय लागणार तरी कशी? आणि इकडे मी बघते काय... मुलं, मुली जिम मध्ये जात आहेत..कुणी सायकल चालवत आहे... कुणी सायकल चालवत आहे... कुणी खेळत आहे... आणि कुणी चक्क गात आहे! नशीबवान पोरं आहेत इकडची!" नीलम हे इतकी तावातावाने बोलली की समोरच्या रांगेत बसलेल्या एक-दोन लोकांनी मागे वळून आमच्याकडे बघितले.
" पण तू देखील डॉक्टर आहेसच! एवढी चांगली फिजिओ झाली आहेस ते... ", मी आपलं उगंच सांत्वन करायचे म्हणून तिच्या डिग्रीची आठवण करून दिली!
" अहो.. कसली डॉक्टर...ती नुसतीच एक जबरदस्ती होती... मला कुठे माहिती होते मी डॉक्टर होणार आहे? आणि झालेच आहे... पण आता त्याचा काही उपयोग आहे का?"
"म्हणजे?" - मी विचारले.
" अहो, दहावीच्या मार्कांनी सर्वात मोठा घोळ घातला आयुष्यात! मला ९०% मिळाले. घरी कुणीतरी डॉक्टर व्हायला हवे होतेच कारण माझ्या आधी घरी कुणीही डॉक्टर झाले नव्हते. तेव्हाच माझे करिअर निश्चित झाले. बारावी होईपर्यंत माझं कल मिडियाकडे जात होता... त्यामुळे टक्केवारी घसरली देखील...८४ वर आली...पण घरचे ठाम होते. माझ्या आईनी बोलून दाखवले होते... माझ्या मुलीच्या नावा मागे डॉक्टर लिहिलेले बघणे हे तिचे स्वप्न आहे म्हणून! माझ्या स्वप्नाची कुणालाच परवा नव्हती.... पण एम.बी.बी.एस करायला तेवढी टक्केवारी पुरेशी नव्हती... बी.डी.एस ला पण नाही मिळू शकला प्रवेश! मी मिडियाचा प्रस्ताव परत एकदा पुढे ठेवला...पण आमच्या आईसाहेबांचे स्वप्नं होते ना.... मग शेवटी फिजियोला प्रवेश मिळाला! आणि अशाप्रकारे मी डॉक्टर नीलम झाले", हसत हसत ती म्हणाली.
"पण मग तू इकडे कधी आलीस?"
" तो म्हणजे बाबांचा साक्षात्कार! फिजियो झाल्यावर तुम्हाला लगेच लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या नाही आहेत... खरंतर त्या कुठेच नाहीत.. .. पण मी स्वतः ५००० च्या नोकरीने सुरुवात केली. वर्ष झालं आणि बाबांनी निष्कर्ष काढला - ह्या अशा पाठी चोळून काहीही होणार नाही... तू सेटल कधी होणार? पण मुलगा डॉक्टरच हवा ह्या अटीने स्थळ शोधणे सुरु झाले... आता ५००० रुपये महिना पगार असलेल्या डॉक्टर मुलीला कुठला डॉक्टर मुलगा भाव देईल? शेवट विशाल दांडेकर हे स्थळ समोर आले. माझ्या एका आत्याच्या बिल्डींग मध्ये ह्याची काकू राहायची...तिकडून कळले! हा काही डॉक्टर वगेरे नव्हता...पण अमेरिकेचा होता ना...लगेच बाबांनी होकार कळवला... मी इकडे येऊन नोकरी करू शकणार नाही हे माहिती असून सुद्धा!"
"पण मग तू काही बोलली नाहीस?" - मी विचाले.
" काय बोलणार? बाबंनी शब्द दिला होता ना.. आणि त्यांच्यामते मी सेटल होण्यासाठी ह्यापेक्षा जास्त चांगली संधी येणे शक्य नव्हते. पण कसली सेटलमेंट... इकडे येऊन समजले की वास्तव निराळेच आहे! विशाल ओहायोला असताना त्याने कसली तरी कन्सलटनसी जॉईन केली होती. ह्याच्यात म्हणे त्याला कुठलेसे software शिकवले गेले आणि नंतर त्याला त्यात ७ वर्षांचा अनुभव आहे असे त्याच्या resume मध्ये लिहिले गेले. आता ज्या मुलाला अमेरिकेत शिकायला येऊन ५ पेक्षा जास्त वर्ष झाली नव्हती त्याला ७ वर्षांचा कुठला आला अनुभव? पण नोकरी देणाऱ्या कंपनीतील recruit करणारा माणूस भारतीय...आणि हा consultant सुद्धा भारतीय! अशी ही अमेरिकेत मोठी साखळी आहे असं कळल्यावर मला धक्काच बसला! आणि नोकरी मिळाल्यावर ह्याच्या बॉसला खरच वाटतं की हा ७ वर्ष अनुभव घेऊन आला आहे.... ते बसलेच आहेत...काम करवून घ्यायला...त्यामुळे शनिवारी आणि रविवारी सुद्धा काम! त्यादिवशी काका म्हणाले होते ते अगदी बरोबर आहे..."
" पण हा तर नोकरी मिळवायचा illegal प्रकार झाला...तुझ्या बाबांना माहिती आहे ह्याबद्दल?"
" अहो, त्यांना तरी किती गोष्टी सांगू मी? त्यांना काय मला देखील वाटले होते आम्ही लगेच सेटल होऊ..... पण apartment मधल्या एका अमेरिकन परिवाराने फेकलेले सोफे आणि खुर्च्या नव्या कोऱ्या परवडत नाहीत म्हणून रात्री बारा वाजता हळूच उचलून आम्ही जेव्हा घरी आणल्या ना...तेव्हा मला इकडची लाईफ काय आहे ते समजले...हे काय मी बाबांना सांगू? विशालला विचारले असता त्याने हेच सांगितले - इकडे असे करावे लागते. बहुतांश भारतीय लोकं हे असंच जगतात! "
गाणे सुरु झाले. आणि डॉ. नीलम अगदी काही क्षणातच ते ऐकण्यात इतकी एकरूप झाली की जणू काही झालेच नाही. जणू काय ती मला काही बोललीच नाही. अर्थात, समोर आलेल्या प्रसंगात अशीच एकरूप होऊन जायची सवय तिला होतीच! अगदी दहावी पासून.
आशय गुणे स्मित